आयपीएल २०२५ चा आढावा!

04 Jun 2025 17:09:24

 
आयपीएल 2025

आयपीएल म्हणजेच Indian Premier League भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी अगदी सणासारखी साजरी करतात. सध्या जगभरातील सगळ्यात अवघड क्रिकेट Tournament म्हणून आयपीएल ओळखली जाते. नुकतेच आयपीएल चे १८ वे संस्करण पार पडले. Royal Challengers Bengaluru म्हणजेच RCB ने पहिल्यांदाच आयपीएल चा किताब आपल्या नावे केला. या लेखात आपण याच आयपीएल च्या १८ व्या संस्करणाचा आढावा घेऊ.

आयपीएलचा हा सिझन खास होता. यात अनेक नवीन रेकॉर्ड्स तयार झाले तर अनेक जुने रेकॉर्ड्स तुटलेही! यावर्षी राजस्थान संघाकडून वैभव सूर्यवंशीने पदार्पण केले. विशेष म्हणजे हा खेळाडू फक्त १४ वर्षांचा आहे, आयपीएलपेक्षाही लहान! वैभवने या सीझनमध्ये त्याची छाप सोडली. गुजरात विरुद्ध सामन्यात त्याने फक्त ३५ चेंडूंमध्ये त्याचे शतक पूर्ण केले. ख्रिस गेल, युसुफ पठाण, डेविड मिलर यांसोबत आता वैभव सूर्यवंशीचे नावही ‘Fastest Century’च्या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर दिसते. याचसोबत १७ वर्षीय आयुष म्हात्रेने चेन्नई संघासाठी पदार्पण केले. विशेष म्हणजे वैभव आणि आयुष हे दोघं U-19 मध्ये भारतीय संघाचे सलामी फलंदाज आहेत!

गुजरात कडून खेळणाऱ्या साई सुदर्शनने सगळ्यात जास्त ७५९ धावा केल्या ते गुजरातच्याच प्रसिद्ध कृष्णाने सगळ्यात जास्त २५ बळी घेतले. मुंबईच्या सूर्यकुमार यादवने सातत्याची एक नवीन परिभाषा सर्वांना दाखवली. त्याने खेळलेल्या १६ सामन्यांपैकी एकाही सामन्यात तो २५ धावांच्या खाली बाद झाला नाही. हैद्राबाद संघाने एकाच सामन्यात २८६ धावा केल्या. पंजाबच्या संघात ५ ते ६ uncapped खेळाडू एकत्र खेळत होते. अशा थोड्या कमी अनुभवी संघाला कर्णधार श्रेयस अय्यरने अंतिम सामन्यापर्यंत पोहोचविले.

असे अनेक अविस्मरणीय क्षण या स्पर्धेनी क्रिकेटप्रेमींना दिले. पण सर्वांसाठीच सगळ्यात मोठा, सगळ्यात अविस्मरणीय क्षण वेगळाच होता. फायनलच्या शेवटच्या ओवरमध्ये जेव्हा बेंगळूरूचा विजय सुनिश्चित झाला तेव्हा ज्याला क्रिकेटचा किंग म्हणले जाते त्याला म्हणजेच विराट कोहलीला अश्रू अनावर झाले. या राजाच्या मुकुटावर सर्व काही होतं, फक्त त्याने याआधी कधी आयपीएल जिंकली नव्हती. १८ वर्षांपासून तो एकाच संघाकडून खेळत होता, त्याने त्या संघाला त्याचा प्राईम दिला होता त्या संघावर खरंतर हि जबाबदारी होती की एक ट्रॉफी विराटसाठी जिंकावी. ही जबाबदारी संघांनी आणि कर्णधार रजत पाटीदारनी यशस्वीरीत्या पार पडली. या संघातील प्रत्येक खेळाडू याच भावनेनी खेळत होता.

विराटप्रमाणेच अजून बरेच खेळाडू असे आहेत ज्यांनी बेंगळूरू संघासाठी खूप काही करून ठेवले आहे पण त्यांच्या नशिबी ही आयपीएलची ट्रॉफी आली नाही. त्यातील दोन खेळाडू म्हणजेच ख्रिस गेल आणि AB de Villiers. हे दोघेही मैदानावर उपस्थित होते. जेव्हा RCB जिंकली तेव्हा हे दोघेही मैदानात संघासोबत सेलिब्रेट करत होते. जणू RCB आणि पूर्ण संघ या दोघांप्रती आणि अशा सर्व खेळाडूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत होता.

असा आयपीएल २०२५ चा शेवटही गोड झाला. या मोसमाने एक गोष्ट सिद्ध केली की क्रिकेट फक्त खेळ नसून भावना, समर्पण आणि इतिहास लिहिण्याची जिद्द आहे!

- देवव्रत वाघ

Powered By Sangraha 9.0